माझी कविता लिहायची इच्छा खूप दिवसा पासून होती. पण यमक आणि कल्पना जुळवताच येत नसत. मी काही कडवी तयार करायचो पण अर्धवट. हा कवितेचा छंद मला परत अचानक लागला म्हटले तरी चालेल. माझा मुंबईचा जॉब सोडताना मी सगळ्यांना 'bye bye' मैल लिहिला. आणि त्यात मी काही कडवी रचली. आणि ती हि अचानक सुचली ५ ते ६ मिनटात. आणि त्या नंतर मी कविता करू शकतो हा विश्वास माझ्यात निर्माण झाला. 'माझी छावी' हि माझी पहिली कविता. काही कविता फक्त मनात होत्या त्या तशाच विरून जाऊ नये म्हणून सोमरस (http://sites.google.com/site/somrasatun/)हि site तयार केली